Breaking News

1/breakingnews/recent

“पंतप्रधान मोदींची बदनामी करणे योग्य नाही”; संजय राऊतांनी चांगलेच खडसावले

No comments


मुंबई -

माझा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे. मोदींनी ज्या पद्धतीने संकटाशी लढण्यासाठी पकड घेतली आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी त्यांनी धोरण आखले आहे.  ते पाहता मद्रास कोर्टाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील असा मला विश्वास आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत आहे का असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल तर आपण सर्वांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसोबत उभे राहिले पाहिजे. जी निती मोदी आखतील त्याच्यासाठी आम्ही उभे राहू असा विश्वास मला द्यायचा आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचा नेता किंवा सरकार यांचा अपमान होणे ठीक नाही. परदेशात प्रसारमाध्यमं, सोशल मीडियावर चित्र रंगवलं जात असून त्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.

भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे हे मोठे षडयंत्रही असू शकतं अशी शंका व्यक्त करताना आपण सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले. मद्रास उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे हेच आम्ही अनेक महिने सांगत आहोत. ममता बॅनर्जी, विरोधक सांगत होते. आम्ही सांगत होतो तेव्हा दिल्लीचील काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. निवडणूक आणि कोरोनाचा काही संबंध नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणूक नाही तिथंही कोरोना झाल्याचे त्यांचे स्पष्टीकरण आहे. पण भाजपाने बंगाल, केरळ, तामिळनाडूत प्रचारासाठी संपूर्ण देशातून लोक तिथे जमा केले. हे चुकीचं नाही, निवडणुकीत अशी रणनीती असते. पण सध्या देशात परिस्थिती ठीक नाही. जर काही लोक कुंभमध्ये गर्दी होते आणि कोरोनाचा फैलाव होतो म्हणून आक्षेप घेत असतील, तर पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये निवडणुकीमुळे अजून गर्दी होते. असे संजय राऊत म्हणाले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *