Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्रात 2 आठवड्यात दिवसाला 1000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती

No comments




मुंबई -

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं म्हणत आहे. कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दररोज नवीन कोरोबाधितांची संख्या वाढतीच आहे. त्यातच आता पुढील दोन आठवड्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली. चार एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची व दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असे सांगितले जात आहे. तसेच नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पुढील 11 दिवसांत मृतांची संख्या 64 हजारांचा टप्पा ओलांडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जिल्ह्यांतून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एक टक्क्याने वाधत असल्याचे स्पष्ट झालेय. याच आकडेवारीवरून हा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. संकलित आकडेवारीवरून मृत्यू दर 2027 टक्के असल्याचे सांगिण्यात आल आहे. याच आकडेवारीवरून पुढील दोन आठवड्यातील परिस्थितीचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यानुसार, पुढील दोन आढवड्यात राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या 28 लाख 24 हजार 382 इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा 64 हजार 613 पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. म्हणजेच राज्यातील पुढील दोन आठवड्यांत कोरोनामुळे दिवसाला 1000 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या 4000ने वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. राज्यात बुधवारी 31 हजार 855 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाला तेव्हापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात रुग्ण आढळले आहे. त्यानंतर राज्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 47 हजार 299 इतकी झाली आहे. बुधवारी राज्यात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 53 हजार 684 झाली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *