Breaking News

1/breakingnews/recent

''आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो'', बाळासाहेब थोरातांचा इशारा

No comments


मुंबई -

गेल्या काही दिवसापासून राज्यात सध्या औरंगाबाद नामांतराचा विषय चांगलाच जोरात रंगला आहे. त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे अशी मागणी होत आहे. परंतु काँग्रेसचा त्याला पूर्णपणे  विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही अशी आठवण काँग्रेस करुन देत आहे. दुसरीकडे भाजपा शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची टीका करत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा नामांतराला पूर्णपणे विरोध असल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेब थोरातानी  यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.असे बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले आहे की माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.असे बाळासाहेब थोरातांचे म्हणे आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *