सूर्य चंद्राचे ज्ञान शिकवू नका, संजय राऊतांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी याना लगावला टोला
News24सह्याद्री -
मुंबई -
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. असे वक्वव्य केले होते. ‘जोपर्यंत सूर्य, चंद्र असले तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही’, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली आहे. सवदी यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सवदी यांच्या या वक्तव्यावरून टीका केली आहे. संजय राऊत यांनी सूर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचे पाहावे, असा टोला सवदी यांना लगावला आहे. बेळगावातील सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहे.
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची लढाई 60 वर्षांपासून सुरू आहे. ही आमच्या हक्काची लढाई आहे. सीमाभागातील जनतेच्या हक्कांची आणि अधिकाराची लढाई आहे. बेळगाव आणि सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रात यायचचे असेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्रात येऊ दिले पाहिजे.
तसेच, कन्नड भाषिक लोक केरळ, आंध्रप्रदेशात असतील तर त्यांना कर्नाटकमध्ये जायचे असेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. देश एक आहे आणि राहील, सीमाभागातील जनतेची लढाई देशविरोधी नाही. भाषावार प्रांतरचना बनवली आहे. तर मराठी भाषिकांना त्यांच्या राज्यात जायचे असेल तर तेथील जनतेच्या भावनेचा विचार न्यायालय, सरकारने केला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले आहे.
No comments
Post a Comment