विजय वडेट्टीवार यांच्या व्यक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक
News24सह्याद्री -
मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा,अशी मुख्यमंत्रीकडे मागणी
मुंबई -
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 'मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरी भरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको', अशा भावना विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या होत्या.
त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
No comments
Post a Comment