Breaking News

1/breakingnews/recent

ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी, नुसते बोलबच्चन : निलेश राणे

No comments

   News24सह्याद्री -



मुंबई - 

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातच पीक गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. टीका करत महटले आहे की, हे नुसते बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचे असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटकरत केली आहे. 

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी, नुसते बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचे असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशी टीका त्यांनी केली आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *