‘ईद-ए-मिलाद’ निमित्ताने उपमुख्यमंत्री यांनी दिला जनतेला संदेश
News24सह्याद्री -
मुंबई -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया, असे आवाहन यांनी ‘ईद-ए-मिलाद’ निमित्ताने शुभेच्छा देताना केले आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होत असलेला ‘ईद-ए-मिलाद’चा सण हा समाजात प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचा संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील असे ईद-ए-मिलाद’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’चा सण साजरा करीत असताना आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे, सोशल डिस्टन्सिंगंचे, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
No comments
Post a Comment