सारीपाट सह्याद्रीचा - बाप्पा, डॉक्टर देव आहेत ना... मग असं का लुटत आहेत ते?
News24सह्याद्री -
महागाईच्या चटक्यापेक्षाही आज सामान्य जनतेला चटका बसतोय तो कोरोना आणि त्याआड चालू असलेल्या दुकानदारीचा! होय दुकानदारीचा! ही दुकानदारी कधी बंद होणार? अरे.... कोरोनाने मृत्यू झाला तर त्या मृतदेहाची विल्हेवाट शासकीय खर्चाने म्हणजेच महानगरपालिकेच्या वतीने लावली जाते. त्यासाठी येणारा खर्च महापालिका करीत असली तरी तो पैसा आमच्या खिशातील! एका अंत्यसंस्कारासाठी ८ हजार रुपये दिले जायचे आणि आम्ही हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणताच जिल्हाधिकार्यांनी यात लक्ष घातले.
आता अवघ्या १४०० रुपयात हा विधी होऊ लागला! जवळपास साडेसहा हजार रुपये प्रति मृतदेह
कितीजण खात होते! अरे बाप्पा, इथल्या प्रशासनाला टाळूवरचे लोणी खाण्याचा
भस्म्या रोग जडला आहे.
No comments
Post a Comment